Saturday, April 25, 2009

या बेशरम राजकारण्याना व नोकरशाहीला सुता सारखा सरळ करशील हे नक्की आहे.

राज मराठवड्यात शेतीला पाणी मिळावे आणि जनतेला पिण्यास पाणी मिळावे मन्हुण शकरराव चव्हान
यानी पशिम महाराष्ट्राच्या मतलबी राजकारण्याचा विरोध पत्करून जायकवाडी धरण बांधले. पण या पाण्याचा
उपयोग शेती आणि जनतेला पाणी तहान भागवण्या पेक्षा बाटालिंग प्लँट साठी जास्त प्रमाणात झाला हे कटू
सत्य आपण मांडले हे लक्ष्यात घेता ईतर राजकारण्याना लाज वाटावयास पाहिजे. या प्रश्ना कडे कोणीही लक्ष्य
देत नाही. केवळ बाटालिंग प्लँट साठी या पाण्याचा उपयोग होत नाही तर बियर करण्या साठी याचा उपयोग होतो.
कारण जायकवाडीचे पाणी म्हणे बियर तयार करण्यास सर्वोतम आहे. सरकारला बियर पासुन करोडचा टॅक्स मिळतो
यासाठी सोन्या सारख्या पाण्याचा दुरुपयोग होतो आहे, याची खुद्ध शकरराव चव्हाण यांच्या मुख्यमंत्री आसलेल्या
मुलालाही काळजी नाही. जनतेचे नक्की काय प्रश्‍न आहेत याची जान आजच्या राजकारण्यात नाही. एक दिवस तू
या बेशरम राजकारण्याना व नोकरशाहीला सुता सारखा सरळ करशील हे नक्की आहे.

No comments:

Post a Comment